पूजेमध्ये चूकूनही करू नका या गलती, जाणून घ्या ईश्वर साधना-आराधनेचे संपूर्ण नियम
सनातन परंपरेत पूजा-पाठाला विशेष महत्व आहे. दैनिक रूपात केल्या जाणाऱ्या ईश्वर पूजेचे काही नियम आहेत, ज्याचे पालन प्रत्येक साधकाने अवश्य करावे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि शुभ फळांची प्राप्ती व्हावी यासाठी ईश्वर पूजेसाठी वापरले जाणारे आसन, हवन विधी, पूजेचा मंत्र आणि तो वाचण्याची पद्धत, आपल्या आराध्य देवतेसमोर दिवा लावणे किंवा मग आरती करण्याचा नियम इत्यादींची संपूर्ण माहिती एका साधकाला असणे आवश्यक आहे. ईश्वराची पूजा केल्याने मन नेहमी प्रसन्न राहते. सनातन परंपरेत आपल्या आराध्य देवतेच्या पूजेसाठी वेळ, स्थान आणि करण्याची पद्धत देखील निश्चित केली आहे. जर तुम्ही विधी–विधानाने आपल्या देवी–देवतांची पूजा करत असाल तर नक्कीच तुमची पूजा लवकरच यशस्वी होईल.
चला तर जाणून घेऊया की ईश्वराची पूजा करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
1.सर्वात पहिला नियम म्हणजे आपण ईश्वराची पूजा शरीर आणि मनाने पवित्र होऊन केली पाहिजे, म्हणजे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून शांत आणि पवित्र मनानेच पूजेसाठी बसायला हवे.
2.पूजा करताना कोणावरही रागवू नये.
3.ईश्वराची पूजा नेहमी एका ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा.
4.ईश्वराच्या पूजेसाठी ब्रह्म मुहूर्ताची वेळ सर्वात शुभ मानली जाते. जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक निश्चित वेळ ठरवू शकता.
5.पूजेसाठी बनवलेले स्थान नेहमी ईशान्य कोनात असायला हवे.
6.त्याचबरोबर पूजेच्या वेळी आपले तोंड देखील नेहमी ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवे.
7.कधीही देवी-देवतांकडे पाठ करून किंवा पाय करून बसू नये.
8.पूजा-पाठ आसनाशिवाय करू नये. पूजेनंतर आपल्या आसनाखाली दोन थेंब पाणी टाका आणि ते कपाळाला लावा, त्यानंतरच उठावे, नाहीतर तुमच्या पूजेचे फळ देवराज इंद्राला जाते.
9.ईश्वरासाठी लावलेल्या दिवाखाली तांदूळ अवश्य ठेवावे.
10.या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी की पूजेचे घर कधीही पायऱ्या किंवा शौचालयाच्या खाली बनवू नये.
11.पूजेच्या स्थानी कमीत कमी देवी-देवता स्थापित करा आणि दररोज त्यांना स्वच्छ करा.
चुकूनही करू नका हे काम
1.भगवान शिव, गणेश आणि भैरव जी यांच्या मूर्तीवर तुळस वाहू नये.
2.गणपतीला प्रसन्न करणारी दुर्वा देवी भगवतीच्या पूजेत वापरू नये.
3.पवित्र गंगाजल कधीही प्लास्टिक, लोखंड किंवा ॲल्युमिनियमच्या पात्रात ठेवू नये.
4.गंगाजल ठेवण्यासाठी तांब्याचे भांडे उत्तम मानले जाते.
5.तांब्याच्या पात्रात चंदन ठेवू नये आणि पातळ चंदन देवी-देवतांना लावू नये.
6.भगवान सूर्यदेवाला कधीही शंखाने अर्घ्य देऊ नये.
7.विष्णूप्रिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीला कधीही स्नान केल्याशिवाय स्पर्श करू नये आणि तिची पाने तोडू नये.
8.पूजेमध्ये कधीही दिवा लावण्यासाठी दिवा वापरू नये.
9.पूजाघरात कधीही खंडित, फाटलेले-जुने किंवा मृत लोकांचे फोटो ठेवू नये.
10.पूजाघरात कधीही धन इत्यादी लपवून ठेवू नये.